भारत-अमेरिका अणू करार
भारताने अमेरिकेसोबत अणुशक्तीच्या नागरी आणि लष्करी वापरावर दूरगामी परिणाम करणारा करार करायचा घाट २००५ पासून घातला होता. कराराच्या अंतिम मसुद्यावर तात्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या २००६ मधील भारतभेटीत शिक्कामोर्तब झाले. या कराराप्रमाणे
१) भारताने अणुशक्तीविषयक कार्यक्रमांची आणि अणुभट्टय़ांसहित आस्थापनांची नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या (आयएए) तपासणीसाठी खुले (नागरी) आणि गुप्त (लष्करी) अशी विभागणी करायची आहे. नागरी क्षेत्रातील साधनसामग्री लष्करी कार्यक्रमाकडे वळवण्याला पायबंद घालणे हा अशा तपासणी अधिकारांचा हेतू असतो.
२) अमेरिकेने भारतीय नागरी कार्यक्रमांना सहकार्य देता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्यांत बदल करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
#BestTelegramChannel @mpscmantra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत