डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- जन्म: १४ एप्रिल १८९१ @ महू
- मूळ आडनाव : सपकाळ
- मूळ गाव: आंबवडे
- बहिष्कृत हितकारणी सभा- १९२४
- या सभेच्या माध्यमातून त्यांनी वसतिगृहे, वाचनालय, प्रौढांसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
- या सभेने १९२५ मध्ये सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरु केले.
- महाडचा सत्यागृह – मार्च १९२७
- मनुस्मृतीचे दहन - २५ डिसेंबर १९२७
- काळाराम मंदिर सत्यागृह - ३ मार्च १९३०
- नेतृत्व - बाबासाहेब आंबेडकर, अमृतराव रणखांबे, भाऊराव गायकवाड, इ.
- २ मार्च १९३०- नाशिकचा जिल्हाधिकारी गोर्डन यांनी मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिला
- १५ एप्रिल १९३२ -या रामनवमीच्या दिवशी देवराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महार स्त्रियांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
- १९३५ मध्ये मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
- आंबेडकर अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ते सरकारनियुक्त प्रतिनिधी होते.
- पुणे करार - २३ सप्टेंबर १९३२
- तरतुदी.
- आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा व संयुक्त मतदार संघाचा स्वीकार करावा.
- दलितांसाठी १४८ जागा राखीव. केंद्रात १८ % जागा राखीव.
- हरिजन हे हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग असल्याचे बाबासाहेबांनी मान्य केले.
- अस्पृश्य उद्धारासाठी गांधीजीनी प्रयत्न करण्याचे मान्य केले
- बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी मुंबई विधानसभेत महारांच्या वंशपरंपरागत हुद्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्त्या सुचविणारे विधेयक सादर केले.
- महार वतन रद्द करण्यासाठी १९२७ साली चळवळ सुरु केली.
- " मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही " येवला येथे घोषणा - १३ ऑक्टोबर १९३५
- त्यांनी 'मुंबई इलाखा महार परिषद' जून १९३६ मध्ये घेतली @ मुंबई.
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी या परिषदेत धर्मांतराचा ठराव मांडला.
- (हैद्राबाद संस्थानात प्रती आंबेडकर म्हणून समजले जाणारे बी.एस. व्यंकटराव हे या परिषदेचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी त्यांना दख्खनचे आंबेडकर [हैद्राबादी आंबेडकर] हि पदवी दिली.)
- स्वतंत्र मजूर पक्ष - १५ ऑगस्ट १९३६
- जनता हे या पक्षाचे मुखपत्र
- ध्येय: काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाचे हित पाहणे.
- १९३७ च्या मुंबई प्रांताच्या निवडणुकीत भायखळा-परळ या राखीव जागेवर बाबसाहेब निवडून आले.
- वऱ्हाड प्रांताच्या १५ पैकी ५ जागा तर मुंबई प्रांताच्या १५ पैकी ११ जागा या पक्षाने जिंकल्या
- मध्यप्रांत वऱ्हाडातील बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या पक्षाने केला.
- बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धती व महार वतन रद्द करण्यासंबंधीचे विधेयक मुंबई कायदेमंडळात मांडले.
- १९४२ मध्ये हा पक्ष विसर्जित करून अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना केली.
- अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन – १९४२
- १९४५ - पीपल्स एज्यूकेशन सोसायटी @ मुंबई
- सिद्धार्थ कॉलेज @ मुंबई - २० जून १९४६
- मिलिंद कॉलेज @ औरंगाबाद - १९ जून १९५०
- रिपब्लिकन पक्ष – १९५६
- हिंदू संहिता विधेयक
- ऑक्टोबर १९४८ - त्यांनी हिंदू संहिता तपासून आणि सुधारून घटना समितीसमोर मंडळी होती.
- बाबासाहेबांनी हे विधेयक फेब्रुवारी १९५१ मध्ये लोकसभेत मांडले
- समर्थन : न. वि. गाडगीळ , (जवाहरलाल नेहरू- सुरवातीला समर्थन नंतर विरोध)
- विरोध: सरदार वाल्लभाई पटेल, श्यामप्रसाद मुखर्जी, सरदार भूपेंद्रशिंहजी
- कायदामंत्री पदाचा राजीनामा
- जानेवारी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत ते कॉंग्रेस चे उमेदवार नारायण काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले.
- वृत्तपत्रे
- मूकनायक (पाक्षिक) -१९२०
- बहिष्कृत भारत - ३ एप्रिल १९२७
- दलित चळवळीचे मुखपत्र
- या वृत्तपत्रातून लोकहितवादींचे शतपत्रे पुन्हा प्रकाशित करण्यात आली.
- या वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी महार व त्यांचे वतने यावर लेख लिहिले.
- जनता(पाक्षिक) - १९३१
- १९५६- बौद्ध धर्माचा स्वीकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत