• New

    राज्यात सुरू होणार शंभर शेतकरी आठवडे बाजार


    • शेतकऱ्यांना शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे विविध शहरांत शंभर शेतकरी आठवडे बाजार सुरू केले जात आहेत. 
    • त्याचाच एक भाग म्हणून पुणे, नागपूर, मुंबईत २७ बाजार सुरू झालेले आहेत. 
    • पणन मंडळाने पहिल्या टप्प्यात पुणे शहरात २९ जून २०१४ रोजी पहिला शेतकरी आठवडे बाजार सुरू केला होता.
    • नागपूरला तीन, तर मुंबईत एक आठवडे बाजार सुरू आहे. 

    अशी आहे संकल्पना 
    • शेतकरी, ग्रामीण महिला बचत गटांच्या मालाला थेट बाजारपेठ
    • शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादक सहकारी संस्थांच्या मालाची त्यांनी पुरस्कृत केलेल्या गट-प्रतिनिधींमार्फत विक्री
    • वेळ व ठिकाण निश्‍चित असल्याने काढणी आणि विक्रीचे नियोजन शेतकऱ्यांना शक्‍य. 
    • इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन-काट्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास 
    • बाजारपेठेचा अंदाज येत असल्याने मालाबाबत नियोजन शक्‍य. 
    • शंभर टक्के रोखीने व्यवहार. कसल्याही परवान्यांची आवश्‍यकता नाही. 
    शेतकरी आठवडे बाजाराचे फायदे
    • थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी. 
    • काढणीनंतरच्या नुकसानीत मोठी घट. 
    • १०० टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांच्या हाती. 
    • बाजारभाव ठरविण्याचा शेतकऱ्याला अधिकार 
    • अत्यंत कमी विक्री खर्च 
    • मागणीनुसार मालाचा पुरवठा. 
    • ताजा, स्वच्छ शेतमाल स्वस्तात उपलब्ध

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad